Mumbai News:मुंबईतील 20 टक्के जमीन ‘या’ 9 जमीन मालकांकडे! राजधानीतील सगळ्यात मोठा जमीनदार कोण ? पहा यादी

Mumbai News : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी अर्थातच मुंबई शहरात स्वतःचे घर असावे असे स्वप्न कित्येकांनी उराशी बाळगल असेल. पण राजधानीत घर घेणे म्हणजेच फारच जिकीरीचे काम.

कारण राजधानीतील घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

राजधानीतील घरांच्या आणि जमिनीच्या किमती सातत्याने वाढतच आहेत. या शहरात जमिनीचा मोठा शॉर्टेज आहे. यामुळेच मुंबई शहराची घनता ही देशातील इतर शहरांपेक्षा अधिक आहे.

पण तुम्हाला माहिती आहे का मुंबई शहरांमधील 20% जमीन फक्त नऊ लोकांकडे आहे. या राजधानीच्या अन सर्वात महागड्या शहरातील जवळपास 20% जमीन फक्त नऊ जमीनदारांकडे असून आज आपण याच संदर्भातील माहिती जाणून घेणार आहोत.

या 9 जमीनदारांकडे आहे मुंबईतील सर्वाधिक जमीन

स्वप्ननगरी, मायानगरी, बॉलीवुड नगरी अशा असंख्य नावाने चीरपरिचित राजधानी मुंबई येथे जमिनीची टंचाई असली, तरीही 2015 मध्ये स्लम रिहॅबिलिटेशन अथॉरिटी (SRA) च्या सर्वेक्षणात एक धक्कादायक माहिती समोर आली होती.

या संबंधित सर्वेक्षणाच्या अहवालात अशी माहिती समोर आली होती की, मुंबईच्या सुमारे 20% जमिनीवर केवळ 9 पारसी ट्रस्ट्स आणि कुटुंबांचा अधिकार आहे. या सर्वेक्षणातुन उपलब्ध झालेल्या माहितीनुसार राजधानीमधील एकूण 1 लाख एकर जमिनीपैकी सुमारे 34 हजार एकर जमीन राहण्यासाठी योग्य असून त्यातील जवळपास 6,800 एकर जमीन या 9 प्रमुख जमीनदारांकडे आहे.

त्यात गोदरेज कुटुंब 3,400 एकर जमिनीसोबत आघाडीवर आहे. ही जमीन विक्रोळी येथील ईस्टर्न एक्सप्रेस हायवे शेजारी आहे. पिरोजशा गोदरेज यांनी ही जमीन दुसऱ्या महायुद्धाच्या काळात केवळ 30 लाख रुपयांत विकत घेतली होती.

तेव्हापासून ही जमीन गोदरेज कुटुंबाकडे आहे. याशिवाय F.E. Dinshaw Trust यांच्याकडे 683 एकर इतकी जमीन असून ही जमीन मालाड मध्ये आहे. तसेच, प्रतापसिंह वल्लभदास सुरजी कुटुंब यांच्याकडे 647 एकर इतकी जमीन असून ही जमीन भांडुप व आजूबाजूच्या परिसरात आहे.

या यादीत जी. जी. आर्देशीर ट्रस्ट यांचेही नाव असून या ट्रस्टच्या नावावर 508 एकर जमीन आहे जी की चेंबूर भागात आहे. वाडिया ट्रस्ट यांच्याकडेही मोठी जमीन आहे या ट्रस्ट कडे कुर्ला भागातील 361 एकर जमीन असल्याची माहिती या अहवालातून समोर आली आहे. सर बायरामजी जी. जी.भॉय ट्रस्ट या ट्रस्ट कडे मुंबईत जवळपास 269 एकर जमीन आहे.

सर मुहम्मद युसुफ खोत ट्रस्ट आणि वी. के. लाल कुटुंब यांच्याकडे कांजुरमार्ग आणि कांदिवलीमध्ये सुद्धा जमीन आहेत. मुंबई पोर्ट ट्रस्ट, मध्य आणि पश्चिम रेल्वे, राष्ट्रीय वस्त्र महामंडळ, महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकारकडेही शहरातील मोठा भूभाग आहे.

Leave a Comment